Tuesday, 18 June 2013



 ही पोस्ट मी delete केली होती. ती परत पोस्ट करते आहे.
------------------------------------------------------------------------------
आज मी खूप दिवसांनी खूप हसले. मी, धन्या, पवन आणि अश्विनी भेटलो खूप दिवसांनी. आणि खूप भंकस केली. इतकं हसलो की शेवटी तोंड दुखायला लागलं. 
’पवनकुमार गुलाबराव पाटील’ (ज्यानी कोणी Where’s the party yaar हा movie बघितला असेल त्याला या नावातली गंमत नक्की कळेल) परत आलेत साक्षात US of the A वरून. तो अमेरिकेच्या तावडीतून सुटला याचा मला अत्यंत आनंद आहे. मग तो कसा subtly American झालाय यावर मी आणि धन्यानी त्याला खूप पिडलं. इतका उचकला बिचारा.
पवन आणि अश्विनी गेल्यावर मी आणि धन्या एका पेपर bag मधून जांभळं खात खात प्रभात रोडच्या गल्ल्यांमधून भटकत होतो. आणि आम्हाला दोघांना अशक्य हसू येत होतं की कसं लोकांना वाटत असेल आपण ‘couple’ आहोत! आणि कसे आपण सगळे घोळ घालत बसतो लायफात!
त्यांना भेटल्यावर मला एकदम माणसात आल्यासारखं वाटलं. आपल्यासारखेच घोळ आपली मित्रमंडळी पण लायफात घालतात हे बघून कसं बरं वाटतं. प्रत्येकाचा शोध वेगळा, प्रश्न वेगळे, विचारांची बैठक वेगळी, आयुष्याचा चष्माच वेगळा. आणि तरीही प्रत्येक जण एकमेकाचा सोबती. एकमेकांच्या वैचारिक आणि भावनिक घोळांचा वाटेकरी. जरा काही घडलं की वॅक करून सगळे एकमेकांकडे ओकून टाकतात. त्यामुळे ’तुला मी सांगितलं का?’ या प्रश्नाचं उत्तर कायमच ’हो. कधीच सांगितलंस’ असंच येतं.
निर्माणचं स्वप्न जरी नंतर आमच्यापासून दूर गेलेलं असलं तरी हे सगळे लोक मला आयुष्यात भेटल्याबद्दल मी देवाचे कायम आभार मानीन.

Sunday, 16 June 2013



I am writing a blog after ages. 

Things have changed and yet they seem to be the same. First and foremost thing is that UIRF II is over & so is my contract with Prayas. I worked on it for a year. And last few months were crazy hectic. But I enjoyed it immensely. I liked the work culture and people. Seema and Rupali became one of my favourites. Second important thing is that my passport is stamped with UK & Schengen Visa & I have travelled to Europe which tops everyone’s dream destinations. Third thing is my USA Visa is approved. So soon I will be off to USA which is another dream destination of everyone. 

And yet there is a disconnect which has been throughout. 

It’s a weird disconnect. In fact it is so weird that it is hard to capture in words. It seems as if I am chasing some dream destination called happiness and it’s constantly eluding me. So many times I have heard that happiness is not a destination, it’s a journey. And going a step further happiness is a decision.
There are moments of happiness definitely. They are like a spur of joy. For example when I finished all my final reports, cleared all my accounts with Prayas, bid a good bye for Europe and was coming home, I was extremely happy. There was a fountain of joy that was springing up from within. I was singing aloud on my bike. And that night when I and Girija went on a ride I just threw my head back and drank all the wind that I could. And when yesterday I met Dhanya, Pawan & Ashwini after a long time, we just laughed and laughed and laughed. After Ashwini & Pawan went I and Dhanya just roamed and roamed around deccan. After meeting all of them I felt so light headed. 

But I don’t know… this happiness is like a sign wave. It climbs… and then crashes only to go further deep than normal…. And what I am looking for is a deep layer of constant happiness which is not dependent on any external things…

I feel disconnected from myself… from my family… from most of my ‘normal’ friends…. There are now a very very few people and places that I feel comfortable with and connected with…. 

Why does this happen?? I wonder… I guess I need to learn to enjoy the ‘present moment’ whatever…

Wednesday, 2 January 2013

New Year

With a new hope
The year unfolds
To tell a story
Yet untold

Page turns
For a fresh start
New dreams
With warm heart

What it has in bag, for me
I could never know
What kind of seeds
It will sow

Will the seeds grow
As a joy to celebrate
Or as a thorny mess
Hard to penetrate

I wish I knew
Yet I don't want to
For I want a surprise
To see my dreams come true

-Amruta

Thursday, 1 November 2012

Its Winter Again!!

I just love this time of the year!!
Air starts smelling fresh...nights are chilly......mornings extremely pleasant....
Days are lit up yet not hot.....its the harvest time for many crops....
Diwali in air....and.... of course spring on its way!! What more do you want?? :)

Thursday, 20 September 2012

गणेशोत्सव

गणपती बाप्पांचं पुन्हा एकदा आगमन झालंय आणि पुणं पुन्हा एकदा गजबजून गेलंय.
परत तीच मंडळं....चौका-चौकात गणपतीच्या मोठाल्या मूर्ती....परत तेच देखावे....परत तीच सगळी गाणी.... ’प्रथम तुला वंदितो, कृपाळा’... ’गणराज रंगी नाचतो’.... ’सा रे ग म प - म प ध नी सां’..’ॐ कार स्वरूपा’.... ’अशी चिक मोत्याची माळ’....

’या सगळ्याची खरंच गरज आहे का?’..... असे उगीच फालतू प्रश्न न विचारता मजा अनुभवायची ठरवली तर या दिवसांत मजा असते खरी. सगळं city scape च बदलून जातं...

कुठे शिवाजी महाराजांच्या विजयाचं गुणगान चालू असतं.... कुठे विष्णू नागावर विराजमान असतात.... कुठे एखादा शेष नाग गणपतीवर फण्याचं छत्र धरून असतो.... आणि बर्‍याच ठिकाणी of course chain of item-songs... I mean how can you miss it.... काही ठिकाणी त्यांच्या ठेक्यावर फेर धरणारे दिवे तर काही ठिकाणी त्यांच्या ठेक्यावर नाचणारी कारंजी...... आणि त्यासमोर नाचणारे अनेक पोट्टे.... ते देखावे आपल्या मुलांना दाखवायला आलेले अनेक आई-बाबा....असं सगळंच....

सगळीकडेआवाजच आवाज....
बिचारा गणपती.... येतानाचा उत्साह २ दिवसात ओसरून जात असेल त्याचा.... आणि मग फक्तच डोकेदुखी...
लोकांनी ना आरती झाल्यावर मोदकांबरोबर disprin-aspirin पण offer करायला पाहिजे गणपतीला.... सगळ्या २१ च्या २१ गोळ्या खातील गणपती बाप्पा....

या दिवसांमधली मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे ढोल पथकांच्या मिरवणुका. गणेश चतूर्थीपूर्वी साधारण महिना- दीड महिना आधीपासून ढोल पथकांच्या तालमी सुरू होतात. कुठे शाळेच्या प्रांगणात तर कुठे नदीच्या काठी. आणि पहिल्या दिवशी गणपती बसताना आणी शेवटच्या दिवशी विसर्जन होताना या पथकांचे performances होतात. खरोखर देखणा सोहळा असतो.तरूण मुला-मुलींमधली energy channelise करायचा हा खूप सुंदर मार्ग आहे.

याच energy dissipation ची एक दुसरी बाजू आहे. पुण्यात झोपडपट्ट्यांमधे राहणारी ४०% लोकसंख्या आहे. या १० दिवसात हे सगळे लोक उत्साहानी सहभागी होतात. मला त्यांचा उत्साह बघून वाटतं की इतर वेळी somehow त्यांना ignored वाटत असेल का?.... म्हणजे इतर मध्यम वर्गीय लोकांसारखे ते राजरोसपणे चकचकीत रस्त्यावरून जात असतील का? कदाचित नसतील. बुजत असतील. आणि मग या १० दिवसात त्यांना गर्दीत त्यांच्या identity ची चिंता न करता मनमुरादपणे मजा करता येत असेल. वर्षातले ३५५ दिवस एखाद्या १० x १० च्या जागेत दाटीवाटीनी राहत असतील. toilet ला कुठे public toilet मधे नाहीतर उघड्यावर जात असतील....झोपडपटीतल्या अरुंद, अस्वच्छ गल्ल्यांमधे वावरत असतील.... मग त्यांना या १० दिवसात त्यांची रग जिरवावीशी वाटत असेल का?मिरवणुकीत मनसोक्त नाचत असतील....असं आपलं मला वाटतं.

Monday, 20 August 2012

आज मी खूप दिवसांनी स्वाध्याय केंद्राला गेले. जवळजवळ वर्षभरानी.

मधल्या काही काळात मला माझी space हवी होती.
गेल्या २-३ वर्षांपासून जे बघतेय, जे अनुभवतेय ते पचवायचं होतं. त्यात अनेक philosophies होत्या, ideologies होत्या, अनेक paradigms होते, वेगवेगळ्या frames of references होत्या, अनेक लोक होते, त्यांचे वेगेळेवेगळे attitudes होते, अनेक प्रसंग होते....
अनेक दिवस डोकं भणभणलं.....काय चूक काय बरोबर काय चांगलं काय वाईट काय rational काय irrational....पण हळू हळू अनेक fallacies लक्षात यायला लागल्या...

Finally ते सगळं बघून म्हटलं boss हे काही खरं नाही. दादांकडून जे आपल्याला मिळालंय, मिळतंय ते जास्त fundamental आणि महत्वाचं आहे.

आज केंद्रात गेल्यावर खूप प्रवास करून दमून गेल्यावर परत घरी आल्यावर जसं वाटतं तसं वाटलं.

अनघा आणि माझी कायमची रड असायची. की स्वाध्यायमधे आमच्या पिढीत फार intellectual कोणी नाहीत. त्यामुळे एक दादांची प्रवचनं सोडलं तर बर्‍यापैकी bore होतं....rapo build होत नाही....जे बाबांच्या पिढीत जमून आलं. त्यांना त्यांच्याच caliber चे अनेक मित्र मिळाले आणि कामाची मजा अनुभवता आली.

पण गेल्या ३-४ वर्षात जे जे अनुभवलं, बघितलं ते बघून असं वाटलं की भले इथे लोक फार intellectuals नसतील पण ते खूप साधे आणि सरळ आहेत. आणि हीच त्यांची सगळ्यात मोठी strength आहे.
खोटा अहं नाही, दंभ नाही, आत एक बाहेर एक नाही, जग बदलायचा आव नाही....
इथे कदाचित तेवढी rationality नसेल, भाबडेपणा असेल, पण इथे विचारांची निर्मळता आहे. Purity of motives आहे.... माणूसपण आहे... वागण्यातला निखळपणा आहे
आणि दादांनी जो रस्ता दाखवला त्यावर मनापासून चालायची इच्छा आहे...ताकद आहे.
आणि तो रस्ता इतका पक्का आहे...चांगल्या वाईटाची reference line इतकी पक्की आहे की आम्ही कोणीही ठरवलं तरी भरकटणार नाही. आजच्या so called भक्तीच्या पूरात वाहून जाणार नाही.

दादांनी लावलेली बीजं आहेत. आंब्याच्या झाडाला सफरचंद थोडीच लागणार?? :)

Thursday, 9 August 2012

पाऊस....गुलज़ारांच्या कवितेतला...

५ ऑगस्टच्या लोकरंग मधे गुलज़ारांच्या पावसाच्या कवितांवर लेख होता.
त्यातल्या मला आवडलेल्या काही कविता.

शाखों पे पत्ते थें
पत्तों पे बूंदे थी
बूंदो में पानी था.....
......पानी मे आंसू थे....

********

रुकती है, थमती है, कभी बरसती है
बादल पे पांव रखे, बारिश मचलती है

********

मोती मोती बिखर रहा है गगन
पानी पानी है, सब पिघलने दो
मेंहा बरसने लगा है आज की रात
आज की रात मेंहा बरसने दो.....

********

पलकों पर एक बूँद सजाए
बैठी हूँ सावन ले जाए
जाए, पी के देश में बरसें
इक मन प्यासा, इक मन तरसे.....

********

-गुलज़ार